CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सावित्री नदीचा धोका! रायगडात पूरस्थिती, ट्रक पलटीमुळे वाहतूक कोलमडली!

On: August 18, 2025 8:34 PM
Follow Us:
सावित्री नदीचा धोका! रायगडात पूरस्थिती, ट्रक पलटीमुळे वाहतूक कोलमडली!

Raigad Rain: गेल्या 24 तासांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड आणि पोलादपूर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलादपूरजवळ 12 चाकी ट्रक उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, आंबेवाडी बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सावित्री नदीचे रौद्ररूप, महाडमध्ये पूरसदृश स्थिती

महाड तालुक्यात सततच्या पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी (6.50 मीटर) गाठली आहे. सकाळी 6 वाजता महाड नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. दस्तुरी नाका आणि मच्छी मार्केट परिसरात सावित्री आणि गांधारी नदीचे पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सांदोशी आणि वाळण कोंडी भागातही मुसळधार पावसाने नद्यांचा प्रवाह वाढला आहे. प्रशासनाने करंजाडी, मस्के कोंड आणि नातोंडी धारेची वाडी यासारख्या दरडग्रस्त गावांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पोलादपूर ट्रक अपघाताने वाहतूक ठप्प

पोलादपूरजवळ चोळाई गावात मुंबई-गोवा महामार्गावर दुपारी 3:45 वाजता चिपळूणहून मुंबईकडे जाणारा 12 चाकी ट्रक (GJ 10 TV 6550) उलटला. चालक सद्दाम महंमद माकोडा (मूळ गुजरात) याचा वेगामुळे ताबा सुटल्याने ट्रक लोखंडी बॅरिकेट्स तोडून पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु ट्रक आणि मालाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. कशेडी महामार्ग पोलिसांनी (सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवलदार रुपेश पवार, श्री. कोंढाळकर, सतीश कदम) घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

आंबेवाडी बाजारपेठेत पाणी, व्यापाऱ्यांचे नुकसान

आंबेवाडी नाक्यावर आणि द.ग. तटकरे चौकात पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी दुकानांमध्ये माल भरला होता, परंतु पुरामुळे हा माल खराब झाला. स्थानिकांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे पाणी साचल्याचा आरोप केला आहे. प्रवाशांना आणि वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Raigad Shop[

प्रशासन सतर्क, नागरिकांना आवाहन

रायगड जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून, महाड नगरपरिषदेने तीन ठिकाणी होड्या आणि बचाव पथके तैनात केली आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

chikhlinews

चिखलीत “संवाद सलोख्याचा”: विकासासाठी सर्वपक्षीय हातमिळवणीचा संदेश..

Rahul Bondre leaked a fake letter on social media against Vidyadhar Mahale

राहुल बोंद्रे यांचेकडून संभ्रम पसरवण्यासाठी गोपनीय पत्र सोशल मीडियावर…?

railway recruitment 2025

उत्तर रेल्वेत ४,११६ अप्रेंटिस पदांसाठी भरतीची संधी!

priti bande chikhli nagarpalika nivadnuk prabhag 1

चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून प्रिती समाधान बांडे-फुलझाडे काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

Leave a Comment